मुंबई – “समान नागरी कायदा गोव्यात लागू आहे. गुजरात,हिमाचल प्रदेश हे राज्यही समान नागरी कायदा लागू करणार आहेत.संविधानाने प्रत्येक राज्याला समान नागरी कायद्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे हळूहळू सर्व राज्य हा कायदा लागू करतील असं मला वाटत”. असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत व्यक्त केले आहे.
माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी समान नागरी कायद्यावर भाष्य केलं. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करू असं फडणवीस यावेळी म्हणालेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील समान नागरी कायदा लागू होणार का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले फडणवीस नेमकं यावेळी
“समान नागरी कायदा गोव्यात आहे आता तो उत्तराखंडमध्ये देखील लागू होणार आहे. त्यासोबतच गुजरात.हिमाचल देखील हा कायदा लागू होणार आहे. मला असं वाटत की,हळूहळू सर्व राज्यांना हे करायचे आहे. महाराष्ट्र देखील याचा योग्य वेळी विचार करेल असं फडणवीस यावेळी म्हणाले”. त्यासोबतच मला असं वाटत की,संविधानाने आपल्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे की आपण समान नागरी कायदा आणू असं स्पष्ट मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.