कोल्हापूर : जे सरकार विश्वासघाताने तयार झाले त्याने शेतकऱ्यांचा विश्वासघातच केल्याची टीका माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारच्या विरोधात लवकरच रस्त्यावर उतणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापूरात बोलत होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सरकार विरोधात हल्लाबोल केला. नागपुरात नुकतच झालेले हिवाळी अधिवेशन म्हणजे नुसती औपचारिकता आहे असे सांगत फडणवीस म्हणाले अधिवेशनात आम्ही उपस्थित केलेल्या कोणत्याही विषयावर त्यांनी चर्चा केली नाही. शेतकऱ्यांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी या मागणीकडे ही त्यांनी दुर्लक्ष केले. परंतुु 25 हजार रुपये हेक्टरी मिळाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.
नागरिकत्व सुधारणा कायद्या बद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. हे निषेधार्थ असून हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, हा नागरिता देणारा कायदा आहे काढून घेणारा नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
तसेच मी बघतलेले उद्धव ठाकरे ते नाहीत त्यामुळे मी नेहमी भाजपची पालखी वाहणार नाही म्हणाले बाळासाहेब असते तर हे खपवून घेतले नसते, असे टीकास्त्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोडले.
सगळ्या परिमाणात आमच्या राज्याची स्थिती चांगली आहे. राज्याची घडी नव्या सरकारच्या हातात दिली त्यावेळी राज्यावर 15.8 टक्के कर्ज होते, आमच्या राज्यात इतर राज्यांपेक्षा चांगली स्थिती असे फडणवीस यांनी यावेळी केले.