मुंबई – राज्यात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचे रॅकेट, तसेच पोलिसांमार्फत खंडणी वसूल करण्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले असून या प्रकरणांवर राज्य सरकारने काय कारवाई केली याचा अहवाल प्रशासनाकडून मागवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळगलेले मौन गंभीर आहे. मुख्यमंत्री जर इतक्या गंभीर विषयांवर बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं करावे, असे फडणवीस म्हणाले. यावर आता राज्यपालांवर आम्ही टीका करणारच, असे म्हणत राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.
If you ever feel in life that nothing is working in your favor just remember Devendra Fadnavis wakes up at 4 everyday and dresses up to call the governer asking him
“Me Punha Yeu ka” 😂😂😂— Kunal Kamra (@kunalkamra88) March 24, 2021
यावर आता स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा ट्विट करत फडणवीसांनावर टीका केली आहे. कुणाल कामरने आपल्या ट्विटमध्ये मी पुन्हा येऊ का ? असा खोचक टोला ही फडणवीसांना लगावला आहे .
नेमकं काय म्हणाला कुणाल कामरा
“जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?”, असं ट्विट कामराने केलं आहे. यामध्ये त्याने स्मायलीजचाही वापर केलाय.