मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आज वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले. तर आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेट कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
https://www.facebook.com/BJP4Maharashtra/posts/3554587107920490
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘इच्छा तिथे मार्ग,टाईमपास तिथे कांजूरमार्ग पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली आरे येथील मेट्रो कारशेडला स्थगिती देऊन कारशेड कांजूरमार्गला हलवून जनतेच्या वेळेचा आणि पैशाचा दुरुपयोग हे सरकार करत आहे.’ असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारच्या मेट्रोचं कारशेड थेट कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णयावर खोचक टीका करत #OneYearMVAFailure असं हॅशटॅग शेअर केले आहे.