मुंबई – मेट्रो 3 ही कुणाच्यातरी गर्वाचे हरण करणारी आहे. कारण महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या मेट्रो 3 ला स्थगिती देण्यात आली होती. हजारों कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कुणाचा तरी इगो दुखावल्याने स्थगिती दिली होती. पण पर्यावरणाचे संवर्धन करणारी ही मेट्रो आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरेंचा इगो दुखावला आणि त्यांनी या मेट्रोला स्थगिती दिली. पण आमचे सरकार आल्यावर आम्ही अत्यंत वेगाने मेट्रोचे काम पूर्ण केले.
त्यामुळे आज पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे. मुंबईमधील रोज 17 लाख प्रवासी या मेट्रोमधून प्रवास करतील, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. वाशिममध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण केल्यानंतर ठाण्यातही काही प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.