नवी दिल्ली – राज्यात निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीच अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ केंद्राचे ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी घेतल्याचा दावा भाजप खासदाराने केला आहे.
भाजप खासदार अनंत कुमार हेगडे म्हणाले कि, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आमचा माणूस महाराष्ट्रात ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला होता. त्यानंतर फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी हे नाटक कशासाठी केलं? बहुमत नसतानाही ते मुख्यमंत्री कसे झाले? असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत.
तर केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पडून होता. दरम्यान, फडणवीस यांना माहिती होते की जर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार सत्तेत आले तर ते विकासाच्या नावाखाली या निधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचं नाटक करण्याचं ठरलं. त्यानुसार, फडणवीस हे मुख्यमंत्री बनले आणि त्यानंतर १५ तासांत त्यांनी ४०,००० कोटी रुपये पुन्हा केंद्राकडे पाठवून दिले, असे त्यांनी संगितले.
Ananth K Hegde,BJP: A CM has access to around Rs 40,000 Cr from Centre.He knew if Congress-NCP-Shiv Sena govt comes to power it would misuse funds meant for development. So it was decided that there should be a drama.Fadnavis became CM&in 15hrs he moved Rs40,000 Cr back to Centre pic.twitter.com/3SNymN1eMQ
— ANI (@ANI) December 2, 2019
दरम्यान, मैं समंदर हूँ जरूर लौटकर आऊंगा, अशा आशयाचा शेर ऐकवत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुन्हा येण्याचे संकेत दिले आहेत.