मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी सरकारमध्ये असलेल्या 3 नेत्यांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी काही मुद्द्यांवर भाष्य करावं असं म्हंटल आहे. यावेळी राऊतांनी प्रकरणांची भली मोठी लिस्टच सांगितली.
“मोदी सुर्य आहेत,चंद्र आहेत.. धूमकेतू आहेत सर्वच आहेत. परंतु मोदी हे किती महान आहेत यावर आम्ही बोललेलो नाही तर तपास यंत्रणांचा कवचकुंडलांसारखा वापर केला जातोय फाडसनविसांनी यावर बोलावं” असं राऊत म्हणाले. तसेच आम्हाला बाजारबुणगे म्हणत असाल तर तुम्ही कोण आहात ? असा सवाल देखील राऊत यांनी यावेळी केला.
घाबरू नका सर्व शक्तिमान लोकांवर कारवाई करा. अदानींना का वाचवताय ? निरव मोदी कसा पळून गेला ? मेहुल चोक्सी..किरीट सोमय्याला संरक्षण कोण देतंय ? विजय मल्ल्या कसा पळाला ? विक्रांत घोटाळा का दाबला गेला ? दादा भुसेंनी पैसे का गोळा केले ? भीमा पाटस कारखान्यात मनी लॉण्डरिंग करणाऱ्यांना कोण वाचवतय ? असे एकामागून एक प्रश्न विचारात देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलावं असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
हा सूर्यप्रकाश आहे तो मोदींमुळेच आहे रात्री चंद्राचं चांदणं पडत तेही मोदींमुळेच पडत आम्ही श्वास घेतो तेही मोदींमुळेच घेतो असा टोला देखील यावेळी संजय राऊत यांनी लगावला.तसेच आम्ही सगळे यावर काहीच बोलत नाही आम्ही फक्त विचारतोय तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण का देताय ? आमच्याकडून तुमच्याकडे गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांना कोणत्या वॉशिंगमध्ये सीबीआयने धुतले हा आमचा प्रश्न आहे असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.