Devendra Fadnavis । राज्यातील कोपर्डीत 8 वर्षांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती. त्या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरून गेले होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला होता. कुटुंबीयांनी पीडितेच्या बहिणीच्या लग्नाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हाच तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेतो आणि त्या लग्नालाही मी आवर्जून येईन, असा शब्द देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. त्यानंतर ८ वर्षांनी दिलेला शब्द पाळत देवेंद्र फडणवीसांनीपीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी लावली. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट करत देवेंद्र फडणवीस हे दिलेल्या शब्दाला पक्के असल्याचे म्हटले आहे.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “शब्दांचे पक्के… असे आहेत आमचे नेते…आज तो दिवस उगवला आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या लग्नसोहळ्याला हजेरी लावत आपला शब्द पाळला. वधू-वराला भरभरून आशिर्वाद दिले. नेता असावा तर असा, दिलेला शब्द पाळणारा…या लग्नात मंगलाष्टक म्हणण्याची संधी मला लाभली, कुटुंबीयांनी ती संधी मला दिली, त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे. सुजय विखे पाटील, राम शिंदे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? Devendra Fadnavis ।
दरम्यान , या मंगलमयी प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,”विवाहाचं निमंत्रण होतं, त्यामुळे कोपर्डीत आलो. वधू -वराला शुभेच्छा दिल्या. आज दोन कुटुंब एकत्र येत आहेत. सर्वजण वधू -वराला आर्शीवाद देण्यासाठी या विवाह सोहळ्याला आले आहेत. मी वधू वराला शुभेच्छा देतो असे म्हटले.
8 वर्षांपूर्वी काय घडलं होतं ? Devendra Fadnavis ।
दरम्यान, 13 जुलै 2016 ला अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला फाशीची शिक्ष सुनावण्यात आली. या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात अनेक मोर्चे निघाले, आंदोलनं झाली. त्यानंतर या आरोपींना अखेर न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. दरम्याान महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेला आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत. काल पीडित मुलीच्या बहिणीचं लग्न होतं. या लग्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.