मुंबई – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मात्र, मुंबईतील वांद्रे परिसरात नागरिकांनी या लॉकडाऊनला विरोध करत मोठी गर्दी केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, या घटनेवरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
‘केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. या कामगारांना अन्न किंवा घर नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे,’ असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं .त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘जबाबदारी झटकून पळ काढू नका’ असे म्हणत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना राज्य सरकारवर टीका केली आहे.
‘वांद्र्यामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणं ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारं आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणं, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणं, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचं आम्ही अनेक दिवसांपासून निदर्शनास आणून देत आहोत, तरीही राज्य सरकारने तसे उपाय केले नाहीत. आजच्या घटनेतून राज्य सरकारने धडा घ्यावा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे.
हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे.
परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.#bandrastation #Mumbai pic.twitter.com/c856TyrRLi— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 14, 2020
‘अशा स्थितीमध्येही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल, तर ते आणखी दुर्दैवी आहे. कोरोनाविरुद्धचा लढा हा राजकीय नाही, हे आतातरी लक्षात घ्या. हा लढा गांभीर्यानेच लढावा लागेल,’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
त्यानंतर पुढे त्यांनी म्हटले आहे की, रेशनकार्ड नसलेल्यांना धान्य द्या,असे सांगतोय्. मा.पंतप्रधान सुद्धा वारंवार सांगताहेत की,रेल्वे सुरू केल्या तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणार नाही,त्यामुळे आपले कोरोनाविरूद्धचे युद्ध कमकुवत होईल. सध्या जे जेथे आहेत,तेथेच त्यांची व्यवस्था करणे,याला सर्वोच्च प्राधान्य हवे.