औरंगाबाद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात विविध विकास प्रकल्प राबवण्याची ग्वाही दिली असून या प्रकल्पांच्या प्रगतीबाबत वेळोवेळी आढावा बैठक घेऊन आपण त्याच्या सद्यस्थितीची माहिती घेतली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद शहरात आले होते. यानिमीत्त तिथे त्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, “सरकार मराठवाड्यात विविध विकासकामे करत असून या कामांचा वॉर रूममधून वेळोवेळी आढावा घेतला जाईल. ते म्हणाले की, आम्ही एलोरा येथील घृष्णेश्वर मंदिरात विकासकामे करणार आहोत. क्रीडा विद्यापीठ स्थापन करणे, औरंगाबादमधील पैठण गार्डन आणि संग्रहालयाचे नूतनीकरण करणे, जालना आणि औरंगाबादमध्ये पाणी पाइपलाइन योजनांची अंमलबजावणी करणे, यासह अन्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील औद्योगिक भूखंड वाटपाला सरकारने स्थगिती दिलेली नाही असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले. 1 जून 2022 नंतर वाटप करण्यात आलेल्या एमआयडीसी भूखंडांवर सरकारने स्थगिती दिल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे त्यावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.