नवी दिल्ली – निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना फाशी देण्यात आल्यानंतर त्यावर प्रतिक्रीया देताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, असे प्रकार पुन्हा घडता कामा नयेत याचा निर्धार आपण केला पाहिजे. कोणाच्याच कन्येला अशा प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ येता कामा नये असे त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.
अशा प्रकरणात आरोपींना कायद्यातील पळवाटा बंद झाल्या पाहिजेत याची दक्षता पोलिस, कोर्ट, केंद्र तसेच राज्य सरकारांनी घेतली पाहिजे असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशी कायदातील पळवाटा शोधून लांबवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे फाशीच्या तारखा जाहीर होऊनही अनेक वेळा त्यांची फाशी टळली होती. त्या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी ही सुचना केली असावी असे मानले जात आहे.