मुंबई – राज्यातील काही दिग्गज नेते आणि मंत्री सध्या विविध आरोप आणि गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत आहेत. यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे 100 कोटी घोटाळ्यांच्या आरोपांप्रकरणी अटकेत आहेत. तसे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणाही अटकेत आहेत. यापैकी तीन नेते कोणत्या न कोणत्या शारीरिक व्याधीने त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी उपचारासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
नवनीत राणा यांनी आपल्याला तातडीने उपचारास परवानगी मिळवी, असा भायखळा कारागृहाकडे अर्ज दाखल केला आहे. राणा यांना मनक्याच्या व्याधीचा त्रास असून कारागृहात जास्तवेळ जमिनीवर बसून आणि झोपून हा त्रास आणखी बळावला आहे. त्यांना 27 फेब्रुवारीला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे राणा यांचा सिटिस्कॅन करण्यात यावा, असे सांगितले होते.
याबद्दल कारागृहातील अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबतच्या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष आणि राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनाही पाठवण्यात आली होती.
दुसरीकडे अनिल देशमुख यांनाही विविध व्याधी आहेत. त्यांनाही काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.