पिंपरी – पवना धरण भरले असतानाही पिंपरी-चिंचवड शहराची पाणीकपात सध्या कायम आहे. सध्या करण्यात येणारा दिवसाआड पाणीपुरवठा बंद करावा. शहरात सर्वत्र समान व पुरेशा दाबाने सर्वत्र पाणीपुरवठा करावा, या मागणीचे साकडे माजी महापौर मंगला कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घातले आहे.
पवना धरण 100 टक्के भरले असल्याने महापालिकेने पाणीकपातीचा घेतलेला निर्णय रद्द करावा. तसेच शहरात सर्वत्र समान व पुरेशा दाबाने दररोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मंगला कदम यांनी केली आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच, आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देखील निवेदनाची प्रत दिली आहे. शहरातील टॅंकर लॉबीला फायदा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली.