जळगाव – पत्नी माहेरी निघून गेल्याने नैराश्यात असलेल्या तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण अशोक जाधव (वय 27, रा. सम्राट काॅलनी, जळगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. लक्ष्मणने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.
लक्ष्मण हा मोलमजुरी करून जीवन जगायचा. पाच वर्षांपूर्वी त्याचे बडोदा (गुजरात) येथील रुपालीशी लग्न झाले होते. दरम्यान, काही महिन्यांपासून कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतापात त्याची पत्नी रुपाली पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेली आहे. पत्नीच्या माहेरी जाण्याने त्याची मानसिक स्थिती बिघडली. यातून सोमवारी रात्री त्याने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
मृत लक्ष्मण याच्या पश्चात पत्नी रुपाली, मुलगा (प्रणव, वय 4 वर्षे), आई शर्मिला, राम व शुभम हे दोन भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.