आळंदी – वारीची परंपरा अखंड ठेवत आज (दि. 13) माउलींच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. मात्र, यावर्षी करोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ 50 मान्यवरांच्या साथीने पालखी सोहळा सुरू होणार आहे.
आळंदीत मंदिराजवळच करोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचे निधन झाले असल्याने या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालखी प्रस्थान सोहळा दुपारी चार वाजता होणारा प्रथा परंपरेप्रमाणे होणार असून, यावेळी श्रींना अभिषेक, आरती-शेजारती असे विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरातच होणार आहेत.