मुंबई – आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. असं म्हणत रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्या प्रकरणी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
“तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात?”
आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.
अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2020