नवी दिल्ली: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. त्यांनी देशात मोदी लाट असल्याचा समज फेटाळून लावले. तसेच नोटबंदी हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सिंग म्हणाले. ते “पीटीआय’वृत्तसंस्थेसोबत बोलत होते.
डॉ. मनमोहन सिंग म्हणाले, मोदी यांच्या पाकिस्तानबाबतचे धोरण निष्कळजीपणाचे होते. देशातील युवक, शेतकरी, व्यापारी आणि देशातील प्रत्येक संस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीची पाच वर्षे सर्वाधिक त्रासदायक आणि विनाशकारी होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना बाहेरचा रस्ता दाखवला जायला हवा.