रांची – झारखंड हे गरीब राज्य आहे. या राज्याची केंद्राकडे तब्बल 1 लाख 36 हजार कोटी रूपयांची थकबाकी आहे. अनेकदा पाठपुरावा करूनही हे पैसे त्यांनी दिलेले नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्याकडे त्यासाठी तगादा काय लावला, त्यांनी आमच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला अशी व्यथा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (chief minister hemant soren) यांनी व्यक्त केली आहे.
तथापि त्यांनी म्हटले आहे की मी आदिवासीचा मुलगा आहे आणि भय किंवा घाबरणे आमच्या रक्तातच नसते . त्यामुळे त्यांच्या कोणत्याही धमकावण्याच्या कृतीचा काही एक परिणाम होणार नाही असेही हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे.
आदरणीय गुरूजी (शिबु सोरेन) हे वयाच्या एका वेगळ्या टप्प्यावर आहेत त्यांना धमकावून त्यांच्या मार्फत मला टार्गेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोपही त्यांनी केला. आम्ही गरीबांसाठी आणि आदिवासींसाठी समर्पण भावनेतून काम करीत आहोत. सत्ता हे आमचे कधीच लक्ष्य नाही, पण त्या माध्यमातून लोकांचे काही भले करता येईल यासाठी आम्ही सत्तेवर आहोत आणि आमची सत्ता आम्ही पुर्ण पणे त्यांच्यासाठीच चालवत आहोत असेही त्यांनी नमूद केले.
आमची भाजपच्या केंद्र सरकारने पूर्ण आर्थिक कोंडी केली आहे याकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की ते व्यापारी प्रवृत्तीचे लोक आहेत. हे लोक पैसे देणे कधीच सहन करत नाहीत. होता होईलतो पैसे काढण्याकडेच त्यांचा कल असतो असेही त्यांनी नमूद केले. (Demanding dues from Center put central machinery behind us – Jharkhand Chief Minister’s agony)