नगर- करोनामुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपतोय. तब्बल दोन महिने घरात बसलेल्यांना आता पोटाची चिंता पडली आहे. त्यामुळे भिंगारमधील किमान शुक्रवार बाजार तळ सुरु करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
युवक कॉंग्रेसचे नेते मतीन शेख यांनी त्या संदर्भात भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना काल निवेदन दिले. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छावणी परिषदेतर्फे अत्यंच चांगले पाऊल उचलले गेले. त्यामुळेच आजही भिंगार छावणी भागात करोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने भिंगार बाजार तळावरील छोट्या व्यावसायिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे.
त्यात नगर शहातील बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी मिळत असेल, तर भिंगारमध्ये का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात भिंगारमध्ये एकही करोनाबाधित नसल्याने किमान शुक्रवार बाजार तळावरील व्यवसायांना परवानगी मिळावी, अशी भूमिका मतीन शेख यांनी मांडली आहे. बाजार बंद असल्याने फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते मोठ्या रस्त्यावर दुकाने लावत आहेत. त्यातून अपघात क्षेत्र तयार झाले आहे. शुक्रवार बाजार तळावर परवानगी मिळाल्यास सर्व दुकानदार फिजिकल डिस्टन्ससिगचे पालन करतील. त्यासोबत मास्क व सॅंनेटायजरचाही वापर करतील, असे आश्वासन मतीन सय्यद यांनी दिले.