मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल होऊन पुणे सत्र न्यायालयात खटलाही सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी या प्रकरणातील दोन आरोपींनी केली आहे. याबाबत उच्च न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केली आहे. या मागणीवर न्यायालयाने दाभोलकर कुटुंबीयांना भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
#हिवाळीअधिवेशन2022 : शास्ती माफीचा निर्णय पुण्यासह इतर मनपांनाही लागू करावा – आमदार चेतन तुपे
न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी कायद्यानुसार, आरोपपत्र दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने तपासावर आता देखरेख ठेवू नये. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासावरही देखरेख ठेवू नये, अशी मागणी आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यातर्फे न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
यावर आपल्याला याबाबत उत्तर दाखल करायचे असल्याची विनंती दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे वकील अभय नेवगी यांनी न्यायालयाकडे केली. ती मागणी मान्य करत न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांचा कालावधी देत सुनावणी 11 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे.