नगर (प्रतिनिधी) -गेल्या अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना समित्यांची स्थापना करण्याचे काम रखडले आहे. त्यामुळे दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, घटस्पोटीत महिलांचे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याने योजनेपासून वंचित राहात असल्याने या समित्यांची स्थापना लवकरात लवकर करावी, अशी मागणी रुद्र अपंग संघटेनेच्या वतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. अरुण जगताप, प्रदेश संघटक महेश बारगजे, जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा आशा गायकवाड, नगराध्यक्षा शेखर बोत्रे, उपशहराध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, सुमेधा शेजूळ, नगर तालुकाध्यक्ष रामेश्वर तुपे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सागर लोळगे, कमल भागवत, बाळासाहेब गायकवाड, बाबासाहेब शेख आदी उपस्थित होते. गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून समिती स्थापन नसल्यामुळे प्रत्येक तहसील कार्यालयात माहिती मिळणे अवघड झाले असून, नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यासाठी लवकरात लवकर परवानगी मिळावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.