नवी दिल्ली – आंध्रप्रदेशात हिंदुंच्या मंदिराची नियोजनबद्धपणे पाडापाडी सुरू असून असे प्रकार रोखण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाप्रमाणेच हिंदु धार्मिक आयोग स्थापन करण्याची मागणी वायएसआर कॉंग्रेसचे बंडखोर लोकसभा सदस्य के रघुरामकृष्ण राजू यांनी आज लोकसभेत केली.
ते म्हणाले की आंधप्रदेशात हिंदुंची मंदिरे पाडण्याचे जे प्रकार सुरू आहेत त्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केला पहिजे. त्यांनी तो केला नाही तर आंध्रात हिंदुंवरील अत्याचार वाढतच राहतील.
आंध्रात हिंदु बहुसंख्याक असूनही तेथे हिंदुंना अल्पसंख्याकांसारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिरूपती येथील ऐतिहासिक मंदिरातही केवळ एका व्यक्तीच्या इच्छेखातर मोठे फेरबदल केले जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
हिंदु मंदिरातील नियमावलीही या व्यक्तीच्या सांगण्यावरून बदलली जात असून त्याला हिंदुंचा विरोध आहे असे ते म्हणाले.