पुणे- पोलीस आयुक्तालयातील बडा अधिकारी गुन्हयात अडकवणार असून जीवाला धोका असल्याची धमकी देत माहिती अधिकार कार्यर्त्याकडे दोन लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. यानंतर 75 हजाराची रक्कम स्विकारुन उर्वरीत सव्वा लाखासाठी धमकी देण्यात येत होते. याप्रकरणी दोन तथाकथीत पत्रकारांविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधीर रामचंद्र आलाट (51, रा. नरवीर तानाजी वाडी, शिवाजी नगर) यांनी फिर्याद दिली आहे. तर राहुल कांबळे व जहिर मेमन अशी ताब्यात घेतलेल्या तथाकथीत पत्रकारांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आलाट हे भारतीय जनता पार्टी, शिवाजी नगर मतदार संघाचे माजी अध्यक्ष असून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सक्रीय सहभागी असतात. त्यांनी शासकीय अधिकारी व कर्मचारी, राजकीय पुढारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी पंतप्रधान, सी.बी.आय. ई.डी. मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पोलीस आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तक्रारी करीत आहे. अलाट यांना माहिती मिळताच त्यांनी कांबळे याला फोन केला होता त्यावेळी त्याने आलाट यांना सांगितले की, मला तुमचे इन्टेशन कळले असुन आपण कधी भेटायचे असे विचारले. त्यावेळी आलाट यांनी त्याला सांगितले की, मला डोळयांचे ऑपरेशन करायचे असल्यामुळे लवकरच भेटू .
मात्र कांबळे यांनी आलाट यांना तुम्ही मला लवकरच भेटा तुमच्या विरध्द मोठे कांड चालु आहे, त्याप्रमाणे आलाट हे कांबळे व मेमन यांना एका हॉटेलात भेटले .तेव्ह दोघांनी त्यांना 5 ते 6 मोठया पदावरील व्यक्ती तुमच्या मागे लागले असुन त्यांनी आमच्याकडे तुमच्या विरुध्द तक्रारी केलेल्या आहेत. तसेच आमच्या तक्रारी वरुन तुमच्या विरुध्द पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल केला असुन तुम्हाला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
जर तुम्हाला या प्रकरणातुन वाचायचे असेल तर आम्हाला 2 लाख रुपये दयावे लागतील. तुम्ही 2 लाख रुपये दिल्यास सेफ राहाल नाहीतर पोलीस अधिकारी तुम्हाला आतच टाकतील अशी धमकी दिली. राहुल कांबळे यांनी आलाट समोर पोलीस अधिकारी, वकील व इतर दोन ते तीन जणांना फोन करन सुधीर आल्हाट यांच्या विरुध्द आम्ही केलेल्या तक्रारी मागे घेत आहोत असे सांगितले. यानंतर आलाट यांनी दोघांना वेळो वेळी 75 हजाराची रक्कम दिली. मात्र राहिलेले 1 लाख 25 हजार रुपयांसाठी दोघेही आलाट यांना वारंवार फोन करुन धमकी देत होते. या सततच्या धमक्यांना वैतागून आलाट यांनी खंडणी विरोधी विभाग दोनकडे तक्रार दाखल केली होती.