मुंबई – करोनाच्या काळात खाजगी सेवा देणारे डॉक्टर आपल्या रुग्णालयांमध्ये सामान्य रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यातूनही करोना बाधित रुग्णांना ते वेगळी ट्रीटमेंट देत आहेत. यामुळे या डॉक्टर्सना करोनाची बाधा होत आहे. राज्यात आतापर्यंत अनेक डॉक्टर्स दगावले आहेत.
केवळ ठाणे जिल्ह्यात पाच डॉक्टर्स करोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर 75 डॉक्टरांना कोरोनाची लागण झालेली आहे. सध्या अनेक डॉक्टर रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे राज्यातील 45 हजार डॉक्टर्सना शासनाच्या विमा संरक्षण कवच योजनेत सामील करून घ्यावं, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रायव्हेट डॉक्टर्सनी केलेली आहे.
सरकारी डॉक्टर पेक्षा खाजगी डॉक्टरांना तीन पट अधिक करोनाची लागण झालेली आहे. असे निदर्शनात येत आहे. राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हे सर्व खाजगी डॉक्टर्स सेवा देत आहेत. करोना बाधित रुग्णाशी थेट संपर्क आल्यामुळे डॉक्टर्सना धोका निर्माण होत आहे. संपूर्ण राज्यात 45 हजार खाजगी डॉक्टर आपली सेवा बजावत आहेत.
सेवा बजावत असताना राज्य शासनाने सरकारी डॉक्टरांसाठी 50 लाखांचा टर्म इन्शुरन्स दिलेला आहे. ही योजना खाजगी डॉक्टर्सना शासनाने लागू केलेली नाही. त्यामुळे शासनाने खाजगी डॉक्टरांचा विचार करून त्यांनाही या योजनेत सामील करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
राज्यात दररोज किमान एक ते दोन डॉक्टरांचा मृत्यू
सरकारने मोठी ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. जी खाजगी डॉक्टर्सना मिळत नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनचे जेवढे खाजगी डॉक्टर्स आहेत, त्यांचा इ.एम.आय सुद्धा भरायला तयार आहेत. फक्त शासनाने या पॉलिसीमध्ये या खाजगी डॉक्टरांचा सहभाग करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
यावर शासन केवळ विचार करत आहे. पण अजून प्रत्यक्षात कुठलाही निर्णय झालेला नाही. राज्यात दररोज किमान एक ते दोन डॉक्टर्स मृत्युमुखी पडत आहेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी शासनाने विचार करून या योजनेचा लाभ त्यांना द्यावा अशी मागणी होत आहे.