शिवसेनेच्या वतीने आयुक्तांना निवेदन
नगर (प्रतिनिधी) – गेले तीन महिन्यापासून कोव्हिड -19 मुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यूदर वाढत आहे. मनपाच्या वतीने अमरधाम येथील ओट्याची संख्या कमी पडत आहे. तसेच विद्युत दाहिनी मधील बिघाडामुळे मोठा अडथळा निर्माण होत आहे. दोन-दोन दिवस अंत्यविधीस वेळ लागत असल्याने मृतदेहाची विटंबना होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे, तरी नादुरुस्त विद्युत दाहिनी तातडीने दुरुस्त करून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, दत्ता जाधव, परेश लोखंडे, विशाल वालकर, मनीष गुगळे, संजय वलाकटी, अमित लढा आदी उपस्थित होते. काही दिवसापूर्वी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी एका श्वनवाहिनी मध्ये 12 मृतदेह कसे आणले जातात हे जनतेसमोर आणले होते.