पुणे – राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांना शासनाच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे तांत्रिक अधिकाऱ्याचा दर्जा मिळावा, अशी मागणी कृषी पदवीधर ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष नितीन धामणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास व रोजगार हमी मंत्र्यांना पाठविले आहे.
ग्रामसेवकांना तांत्रिक अधिकार नसल्याने त्यांना तांत्रिक अधिकाऱ्यांवर विसंबून राहावे लागत आहे. परिणामी तांत्रिक अधिकाऱ्याला अनेक विभागातील कामे करावी लागत असल्याने संबंधित मजुराला यामुळे कामाचा मोबदला मिळण्यास उशीर होतो.
याशिवाय राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांकडे तांत्रिक पदवी असताना त्यांना कामाचे मोजमाप, मूल्यांकन करण्याचा अधिकार द्यावा, असे या निवेदनात नमूद केले आहे.