कोंढवा – नानापेठ येथील ऐतिहासिक निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असतो. त्यामुळे लाखो भाविकांना विश्रांतीसाठी मंदिराशेजारील मोकळ्या जागेत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाऐवजी (एसआरए) वारकरी भवन उभरावे, अशी मागणी करीत नगरसेवक गफुर पठाण व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या समोर निदर्शने केली.
पुणे महानगरपालिकेच्या मालकीची ही मोकळी जागा असून ती प्राथमीक शाळा आणि मैदानासाठी आरक्षित ठेवण्यात आलेली होती. परंतु, कालंतराने येथे 70 ते 80 कुटुुबांनी झोपडपट्टी वसवली. त्यानंतर विकसकाच्या आर्थिक फायद्यासाठी मागणी नसताना, घोषित झोपडपट्टी क्षेत्रा नसताना “एसआरए’चा घाट महानगरपालिकेकडून घातला जात आहे.
त्यामुळे या ठिकाणी प्रस्तावित एसआरए रद्द करीत वारकरी भवन उभरावे, अशा मागणीचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे नगरसेवक गफुर पठाण व नगरसेवक वनराज आंदेकर यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे. पण, तो अद्याप मंजूर झालेला नाही.