राहुरी विद्यापीठ -महाराष्ट्रातील सुमारे दोन लाख मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर बांधवांच्या जुन्या पेन्शनचा हक्क डावलणारी अधिसूचना कोणत्याही परिस्थितीत रद्द झाली पाहिजे, यासाठी राज्यभर शिक्षक भारतीचे आंदोलन सुरू आहे. आमदार व मंत्र्याना निवेदन दिले जात आहेत.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना शिक्षक भारतीने निवेदन दिले. पंधरा वर्षे मागे जाऊन कायद्यात दुरुस्ती सुचविणारी शालेय शिक्षण विभागाची 10 जुलै 2020 ची अधिसूचना अन्यायकारक आहे, ती तातडीने रद्द करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करून शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहिण्याची विनंती केली.
याबाबत शालेय शिक्षण मंञ्याशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यास भाग पाडू , असे आश्वासन कर्डिले यांनी दिले.
शिक्षक भारती राज्यसचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देताना राहुरी तालुका अध्यक्ष संभाजी पवार, उपाध्यक्ष संतोष मगर, सचिव प्रा. संजय तमनर,अनिल लोहकरे, अनिल तोंडे, प्रकाश तनपुरे, लक्ष्मण आरणे आदी शिक्षक भारती कार्यकर्ते
उपस्थित होते.