पुणे : मागील शासनाच्या काळात खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक परिक्षा 2016 मधील अपात्र 636 उमेदवारांची नियमबाह्य पध्दतीने केलेली निवड रद्द करण्याची मागणी पोलीस बॉईज ऑर्गनायझेशनच्या वतीने अध्यक्ष मंगेश रोकडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. यावेळी कार्याध्यक्ष धनंजय वाठारकर, सयाजी सुर्यवंशी, जयंत साळुंके आदी उपस्थित होते.
मंगेश रोकडे यांनी दिलेल्या निवेदनानूसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे 2016 मध्ये पोलिस उपनिरीक्षक विभागीय मर्यादीत स्पर्धा परिक्षेच्या 828 जागांकरीता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही प्रक्रीया उलटून चार वर्षे कालावधी गेला. ही प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर लोकप्रतीनीधी, प्रशासकीय अधिकारी व काही सामाजीक संघटना यांना हाताशी धरुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या 636 उमेदवारांना सामावून घेण्याबाबात वेगवेगळ्या विभागांचे अभिप्राय मागवण्यात आले होते. त्यामध्ये सामान्य प्रशासन, विधी व न्याय विभाग, गृह विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सदर उमेदवारांना बढती देणे चुकीचे व असवैधानिक आहे असे स्पष्ट केले.
या सर्व विभागाचे अभिप्राय बढती देणे चुकीचे असतानाही लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी 636 उमेदवारांना समावून घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळाकडून मंजूर करुन घेतला आहे. यांना सामावून घेतल्याने नवीन जाहीरातीवर याचा परिणाम होत आहे. सन 2018 व 2019 मध्ये जाहीरात आली नाही. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2020 च्या वेळापत्रकातही सदर परिक्षेचा उल्लेख केला नाही.
सलग 4 वर्षे जाहिरात नसल्याने अनेक मुलांची वयोमर्यादा पार होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न धुळीस मिळालेले आहे. सदर गैरव्यवहार व नियमबाह्य निवडी बाबत 636 यांच्या विरुध्द विविध न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली आहे. सदर याचिकेचा जो पर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत 636 पोलिस उप निरीक्षकांची असवैधानिक निवड रद्द करण्यात यावी