नगर – शहरात अस्ताव्यस्त वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करावी, अशी तक्रार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शहर वाहतूक शाखेकडे केली आहे.
शहर व उपनगरात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे छोटे-मोठे अपघात होतात. वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशा पध्दतीने वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना शिस्त लावणे आवश्यक आहे.
पार्किंग नसलेल्या ठिकाणी तसेच दुकानासमोर रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी. शहरात अनेक ठिकाणी बऱ्याच वर्षापासून वाहने उभी करून ठेवण्यात आलेली आहेत. मनपा कर्मचाऱ्यांना साफसफाई करताना त्याचे अडथळे येतात. त्यादृष्टीने अशा वाहनांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापौर वाकळे यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्याकडे केली.