नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारच्या सैन्य भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेवर टीका केली आहे. अग्निपथ योजनेवरून देशभरात सध्या गदारोळ सुरू आहे. त्यात आता आपची प्रतिक्रिया आली आहे.
सिसोदिया म्हणाले की, अग्निपथ योजना इतकीच चांगली असेल तर आमदार आणि खासदारांच्या मुलांसाठी या योजनेत नियम बनवावेत. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सिसोदिया यांनी ट्विट केले आहे.
मनीष सिसोदिया यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “अग्निपथ योजना इतकी चांगली असेल तर एक नियम बनवा – देशभरातील प्रत्येक आमदार आणि खासदाराची मुले 17 वर्षांची होताच या योजनेअंतर्गत 4 वर्षांची नोकरी करतील.
अग्निपथ योजना अगर इतनी ही अच्छी है तो नियम बना दो –
– देश भर में हर MLA और MP के बच्चे 17 साल के होते ही सबसे पहले इस योजना के तहत 4 साल की नौकरी करेंगे.— Manish Sisodia (@msisodia) June 18, 2022
मनीष सिसोदिया यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, प्रत्येक तरुणाला सैन्यात भरती होण्याचा आणि आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करण्याचा अधिकार आहे. परंतु आज भाजप त्यांचा हा हक्क हिरावून घेत आहे. देशभरात होत असलेली निदर्शने हा भारतातील तरुण अग्निपथला कधीही स्वीकारणार नाही याचा स्पष्ट पुरावा आहे. देशसेवेच्या ध्यासापेक्षा कोणतेही धोरण किंवा कायदा मोठा असू शकत नाही, असंही सिसोदिया यांनी म्हटलं.