नवी दिल्ली : दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेवर सोमवारी रात्री उशिरा कार आणि ट्रकची जोरदार टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या भीषण रस्ते अपघातात एका मुलासह पाच जण ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये दोन कुटुंबे होती. यात तीन मुलांचा समावेश होता. दोन्ही कुटुंब हरिद्वारहून गाझियाबादकडे जात असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सर्व गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले.
उपचारादरम्यान दोन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला. गाझियाबादच्या मसूरी पोलीस स्टेशन परिसरात हा अपघात झाला. ज्या ट्रकने हा अपघात घडला तो भोजपूर पोलीस स्टेशन परिसरातील पोलिसांनी पकडला. घटनेनंतर संपूर्ण कुटुंबात दु: खाचे वातावरण आहे.
ज्या कारमध्ये हा अपघात झाला, त्यामध्ये दोन कुटुंबातील ३ मुले आणि ४ प्रौढ होते. दोन्ही कुटुंबात पती -पत्नीसह ५ जणांचा मृत्यू झाला. २ मुले अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. हे कुटुंब हरिद्वारहून गाझियाबादला परतत असताना हा अपघात झाला. थाना मसूरी परिसरातील मेरठ एक्सप्रेस वेवर कार आणि ट्रकची टक्कर झाली. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः उडाली.