नवी दिल्ली – शहरातील आनंद प्रभात या भागामध्ये मद्यधुंद असलेल्या पतीने त्याच्या पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. या हल्लात त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला असून दिल्ली पोलिसांनी आज त्याला अटक केली आहे.
या दोघांमध्ये काही गोष्टींवरून वाद झाले, आणि त्या वादामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या भांडणामध्ये पतीने चाकूने पत्नीवर वार केल्याने ती जागीच मृत झाली. या दाम्पत्याला एक 3 वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला अटक केली, तेव्हा ही तो दारूच्या नशेतच होता अशी माहिती तेथील शेजाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.