नवी दिल्ली – राहुल गांधी यांना कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देऊ. मात्र, त्यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य केली पाहिजे, अशी अट आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येथे घातली.
ते म्हणाले की, जो पक्ष पुढचे सरकार स्थापन करेल, त्यात भाजपही असला तरी दिल्लीस पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मान्य करायला हवी. अर्थात आम्ही भाजपला कदापि पाठिंबा देणार नाही. राहुल गांधी यांच्याविषयी ते म्हणाले की, त्यांचा जर पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून विचार होत असेल, तर मी त्यांना दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या अटीवर सहाय्य करेन. याच अटीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही पाठिंबा देईन.