मुंबई – नितिश राणा व हिंमत सिंग यांच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने धावांचा डोंगर उभा केला व नंतर मुंबईचा डाव 130 धावांवर गुंडाळत 76 धावांनी मोठा विजय मिळवला.
सोमवारी झालेल्या अन्य लढतींमध्ये बिहार, हरयाणा, सिक्कीम, राजस्थान, सौराष्ट्र व मणिपूर यांनी आपापले सामने जिंकले.
दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना 206 धावांचा डोंगर उभारला. राणाने 37 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने 74 तर, हिंमत सिंगने 32 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली.
या धावांचा पाठलाग करताना शिवम दुबेच्या 63 धावांचा अपवाद वगळता अन्य एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही. त्यांचा डाव 130 धावांवर संपुष्टात आला.