नवी दिल्ली – कोविडमुळे देशाच्या चांद्रयान मोहीमेत काहीसा विलंब झाला आहे अशी माहिती सरकारतर्फे आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात देण्यात आली. केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद यांनी आज लोकभेत ही माहिती दिली. त्यामुळे चांद्रयान 3 मोहीमेच्या वेळापत्रकाचे फेरनियोजन केले जात आहे.
आता 2022 सालच्या तिसऱ्या तिमाहीत ही मोहीम प्रत्यक्षात येईल असे मंत्री म्हणाले. यापुढील काळात हा कार्यक्रम नियोजित पद्धतीने सुरू राहील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अंतराळ मोहीमांमध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया पुर्ण करीत असतानाच कोविडच्या समस्येमुळे त्यात अडथळे आले असे मंत्र्यांनी नमूद केले.
या मोहीमेतील जो भाग वर्क फ्रॉम होममुळे करणे शक्य आहे तो भाग लॉकडाऊनच्या काळातही पुर्ण केला गेला आहे असेही मंत्र्यांनी नमूद केले. भारताची चांद्रयान मोहीम सन 2019 मध्ये राबवण्यात आली होती पण त्यावेळी विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठ भागावर कोसळल्यामुळे ही मोहीम अपयशी ठरली होती.
या पार्श्वभूमीवर आता चांद्रयान 3 मोहीमेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. त्यातून भारताची परग्रहावर आपली यंत्रणा उतरवण्याची क्षमता सिद्ध होणार आहे.