नवी दिल्ली : कारगिल युद्धाच्या 20 वर्षपुर्ती निमीत्त देशभरात आनंद साजरा करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वजण आजचा दिवस साजरा करत आहेत. त्यातच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
Delhi: Defence Minister Rajnath Singh pays tribute at National War Memorial on 20th #KargilVijayDiwas. pic.twitter.com/PWssdObUJY
— ANI (@ANI) July 26, 2019
दिल्लीतील वॉर मेमोरिअलवर जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धातील शहिदांना श्रद्घांजली वाहिली. राजनाथ सिंह यांच्यासोबत सेनेचे वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रातील नेतेदेखील उपस्थित होते. एकीकडे राजनाथ सिंह यांनी कारगिल युद्धातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली तर दुसरीकडे द्रासमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तिथल्या खराब वातावरणाचा फटका बसला आहे. खराब वातावरणामुळे त्यांच्या नियोजित कार्यक्रात बदल करण्यात आला आहे.