मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘सुषमा अंधारे’ हे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शिवसेनेच्या नेत्या म्हणून त्यांनी आपल्या वकृत्वातून राजकीय नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांच्या भाषणांना मुळे शिवसेनेला एका नवीन चेहरा मिळाला असल्याची भावना व्यक्त केली जाता आहे. आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे आपल्या एका व्यक्तव्यामुळे चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. “माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो’, असे विधान त्यांनी केले असून, सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी त्या चंद्रपूरमध्ये एका सभेत बोलत होत्या.
दरम्यान, यावरूनच शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी ‘तुम्ही जर हेड्रेट क्रिएट केला, तुम्ही जर हिंसाचार निर्माण होईल अशी भाषा वापरली आणि समोरच्या व्यक्तीचा तोल सुटला तर काही घडू शकतं’. असं म्हणत अंधारे यांना टोला लगावला आहे. मात्र, आता केसरकर यांच्या विधानानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं दिसून आलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘मी माझ्या संबंधित घातपाताची शक्यता, शंका व्यक्त केली. आज माध्यमांसमोर बोलताना दीपक केसरकर यांनी माझ्या शंकेला पुष्टीच दिली आहे. ते असं म्हणतात की सुषमा अंधारे यांनी भाषा सुधारली पाहिजे त्यांची भाषा अशीच राहिली तर घातपात होऊ शकतो. पण मला हेच जाणवलं की गोड बोलून काटा काढणे याला दुसरं काय नाव असू शकतं तर ते म्हणजे दीपक केसरकर”. असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
‘गोळी घालण्याऐवजी माझा अपघात घडवून आणला जाऊ शकतो..’; नेमकं सुषमा अंधारे असं का म्हणल्या?
चंद्रपूरमध्ये सुषमा अंधारे म्हणाल्या, “माझ्याविरोधात तक्रारी दाखल होतील. आगामी काळात माझ्यावर काही संकटं येऊ शकतात. मात्र मला त्याची पर्वा नाही. काही लोक, अधिकारी मला सांगतात की, रात्रीचा प्रवास टाळा. घात-अपघात होऊ शकतो. आतापर्यंत अपघातात अनेकजण गेले आहेत. तुमच्यावर आरोप करण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते तुम्हाला थेट गोळी घालण्याऐवजी तुमचा अपघात घडवून आणू शकतात. पण मी माझं काम प्रमाणिकपणे करण्याचे ठरवलेले आहे.’ असं विधान त्यांनी केलं आहे.