पुणे – गेल्या काही वर्षांत सतत साखरेच्या उत्पादनात नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या भारताची यंदा मात्र घसरण झाली आहे. देश पातळीवर यंदा साखरेचे उत्पादन 24 टक्क्यांनी घटले असून आतापर्यंत 141.12 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे.
गेल्या वर्षी याच काळात 158.59 लाख टन साखरेची निर्मित झाली होती. साधरणत: साखरचे विपणन हे ऑक्टोंबर ते सप्टेंबरपर्यंत चालते. 31 जानेवारीपर्यंत घेण्यात आलेल्या देशभरातील साखरेच्या उत्पादन आढाव्यात ही माहिती निष्पन्न झाली आहे. सध्या देशात 446 साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी याच तारखेला 520 साखर कारखाने सुरू होते, असे इंडियान शुगर मिल असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 2019-20 च्या विपणन पहिल्या चार महिन्यांत 34.64 लाख टन साखरेचे उत्पादन, तर मागील वर्षी याच कालावधीत 70.99 लाख टन होते. उत्तरप्रदेशात गतवर्षीपेक्षा यंदा साखरेचे उत्पादन वाढले आहे.याठिकाणी आतापर्यंत 54.96 लाख टन ऐवढे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी 52.86 लाख टन झाले होते. कर्नाटकातील उत्पादन गेल्या वर्षी 27.94 लाख टनावरुन 33.76 लाख टन इतके झाले आहे.
“इस्मा’च्यावतीने यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादनाचे 260 लाख टन उद्दिष्ट ठेवले आहे. पण ते पूर्ण होईल, असे वाटत नाही. महाराष्ट्रात यंदा कमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा साधारणत: दहा लाख टन साखरेचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे आता या उद्योगाने सावधतेने पावले टाकणे सुरू केले आहे.