पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात असणारा पावसाचा जोर ओसणार आहे. त्यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ वगळता अन्य सर्वच ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळणार आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवातामुळे राज्यात कोकण अणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर गेल्या काही दिवसांपासून वाढत होता. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे पावसाचा मुक्काम आणखी दोन दिवस वाढला पण आता हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या दिशेने सरकले आहे.