नवी दिल्ली : नक्षलवादाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने खंबीरपणे राष्ट्रीय नीती आणि कृती योजना-2015 राबविल्यामुळे गेल्या पाच वर्षात नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे अशी माहिती केंद्रीय गृह व्यवहार मंत्री जी.किशन.रेड्डी यांनी आज यासंदर्भातील प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
त्यांनी सांगितले की वर्ष 2015 मध्ये झालेल्या नक्षली हिंसाचाराच्या 1089 घटनांच्या तुलनेत या वर्षी म्हणजे 2020 च्या फेब्रुवारी महिनाअखेर पर्यंत नक्षली हिंसाचाराच्या फक्त 123 घटना नोंदल्या गेल्या आहेत. नक्षलवाद्यांशी लढण्यासाठीच्या मोहिमेमध्ये मोठ्या, लहान आणि सूक्ष्म आकाराच्या मानवविरहित हवाई यंत्रांचा देखील उत्तम उपयोग केला गेला असे त्यांनी सांगितले.
नक्षलवादी हिंसाचाराच्या घटनांमध्ये 2015 साली संरक्षण दलाच्या 56 कर्मचाऱ्यांनी जीव गमावला, तर या वर्षी म्हणजे 2020 च्या फेब्रुवारी महिनाअखेर पर्यंत पाच कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे अशी माहिती रेड्डी यांनी दिली.