संयुक्तराष्ट्रे: भरतातील कुपोषित व्यक्तींच्या संख्येत सुमारे सहा कोटींनी घट झाली आहे. सन 2004 ते 2006 या काळात भारतात कुपोषित लोकांची एकूण संख्या 21.7 टक्के इतकी होती ती सन 2017 ते 2019 या काळात 14 टक्के इतकी झाली आहे असे संयुक्तराष्ट्र संघटनेच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संयुक्तराष्ट्र संघटनेचा अन्न सुरक्षा आणि पोषण या संबंधातील जागतिक अहवाल सोमवारी जाहीर झाला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. वर नमूद करण्यात आलेल्या काळात भारतातील कुपोषित नागरीकांची संख्या 24 कोटी 94 लाखांवरून 18 कोटी 92 लाख इतकी झाली आहे.
पुर्व आशिया आणि दक्षिण अशिया या विभागातील विविध स्वरूपाच्या स्थितीत सुधारणा झाल्यामुळे तेथील उपासमारीची स्थिती कमी झाली असल्याचे यात नमूद करण्यात आले असून या विभागात भारत आणि चीन या दोन देशांचा समावेश होतो. संयुक्तराष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना तसेच इंटरनॅशनल फंड फॉर अग्रीकल्पचरल डेव्हलपेंट, चिल्ड्रन्स फंड (युनिसेफ), आणि युएन फूड प्रोग्रॅम या संघटनांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने हा अहवाल सादर केला आहे.
भारतात पच वर्षाच्या खालील मुलांच्या कुपोषणाच्या स्थितीतही बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. सन 2012 मध्ये भारतात पाच वर्षाखालील मुलौपैकी 47.8 टक्के मुले कुपोषित होती हेच प्रमाण सन 2019 मध्ये 34.7 टक्के इतके झाले आहे.
तथापि 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कुपोषणाचे भारतातील प्रमाण मात्र काहींसे वाढले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. या अहवालात म्हटले आहे की एकूण जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 69 कोटी लोक सध्या कुपोषित आहेत. ही सन 2019 वर्षाची स्थिती आहे. सन 2018 पेक्षा हा आकडा एक कोटीने वाढला आहे.