मुंबई – पहिल्या तिमाहीत भारतातील मोठ्या कंपन्यांना तोटा होत असल्याची आकडेवारी बाहेर येत आहे. त्याचा परिणाम शेअरबाजार निर्देशांकांवर झाला.
गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 335 अंकांनी म्हणजे 0.88 टक्क्यांनी कमी होऊन 37,736 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी कमी होऊन 11,102 अंकांवर बंद झाला. इंडिगो कंपनीला 2,844 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. भारती एअरटेलला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्हकडून फारसे सकारात्मक संदेश न मिळाल्यामुळे जागतिक बाजारातील वातावरण खराब होते.