नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला नव्याने निर्देश दिले आहेत. त्यामध्ये केवळ लॉकडाउन करून पर्याय निघणार नाही तर कंटेन्मेंट झोन जाहीर करा आणि कठोर उपाययोजना करा, असे केंद्र सरकारने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशात म्हटले आहे.
जगाचा विचार करता कोरोनाबाधितांचा आकडा 120, 761, 841 पर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत 26,71,720 इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे तर कोरोनामुक्त 9,74,02,129 जण झाले आहेत. अमेरिकेनंतर ब्राझिलचा क्रमांक लागतो तर तिसरा क्रमांक भारताचा लागत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतामध्ये एकूण11,409,524 कोरोनाबाधित रुग्ण असून यात 24,366 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा 158,892 इतका असून काल 130 जणांची भर पडली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र राज्यात सलग पाचव्या दिवशी 15 हजारांहून जास्त रुग्ण वाढले आहेत.
केंद्र सरकारने नव्याने दिलेले निर्देश?
– केवळ लॉकडाउन करून पर्याय निघणार नाही तर कंटेन्मेंट झोन झोन जारी करण्याची गरज आहे.
– प्रत्येक सकारात्मक प्रकरणात, कमीतकमी 20 ते 30 जवळचे संपर्क (कौटुंबिक संपर्क, सामाजिक संपर्क, कामाच्या ठिकाणी संपर्क आणि इतर प्रासंगिक संपर्कांसह) त्वरित शोधून काढणे आवश्यक आहे.