मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, सुमारे 25 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
साताऱ्यात विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल एकत्र येणार असल्याने त्या निकालासाठी काहीसा विलंब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, आम्हाला खुप मोठं बहुमत मिळेल. उत्तर महाराष्ट्रातही मोठं यश मिळेल. आम्हाला 220 जागांची अपेक्षा आहे, असे मत गिरीष महाजन यांनी व्यक्त केले. 90 टक्के जागा सेना-भाजपाला मिळतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची जादू चालणार नाही. राष्ट्रवादीच्या जागा येतील. पण त्या फार काही फरक पाडणार नाहीत, असंही ते म्हणाले.