पुणे – पुण्यासह मुंबई, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकीची बा न्यायप्रविष्ट आहे. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.
प्राधिकरणाने राज्यातील 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी ँकांपैकी 16 बॅंकाच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तर शासनाने नाशिक, नागपूर, सोलापूर, बुलढाणा आणि उस्मानाबाद अशा पाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर असेल, त्या टप्प्यावर पुढे ढकललेल्या आहेत. 2022 या वर्षांत निवडणुकीस पात्र असलेल्या रायगड आणि जालना या दोन जिल्हा बॅंकांच्या निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने अद्याप सुरू केलेल्या नाहीत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकीची बा मुंबई उच्च न्यायालयात आहे. यामुळे काही जिल्हा बॅंकांचा निवडणुकांचा कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर स्थगित केला आहे.