मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा तसेच देशांतर्गत स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर आयोजित करण्यात येणार असून त्याबाबतची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
खेळाडूंना करोनाच्या संकटामुळे गेले तीन महिने घरातच बसून राहावे लागले आहे. आता हा धोका अनेक ठिकाणी कमी झालेला दिसत असल्याने सराव शिबिर आयोजित करण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. मात्र, हे शिबिर घेतले गेले तर त्यात लॉकडाऊन व सीमाबंदीमुळे अनेक खेळाडूंना या शिबिरात सहभागी होणे शक्य होणार नसल्याने शिबिराबाबत संभ्रम कायम राहिला आहे.