कोल्हापूर : राज्यभरात गाईच्या दूध दरावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजपा एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकले आहेत.
त्यातच गायीच्या दुधाला सरसकट 10 रुपये प्रतिलिटर अनुदान आणि दूध पावडरला प्रतिकिलो 50 रुपये अनुदानाच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. आज प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन 1 ऑगस्टचे अल्टिमेटम देण्यात आलं आहे.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गायीचे पवित्र दूध प्राशन करुन न्यायबुद्धीने निर्णय करा, असं म्हटलं आहे. हे पत्र चंद्रकांत पाटील यानी मुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे पाठवले आहे.