मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेमध्ये अभिभाषण केले. यावेळी त्यांचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केले. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करण्यात येणार आहे. तसेच भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल आणि राज्यातील जनतेला १० रुपयांत जेवण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज त्यांच्या अभिभाषणातून दिलं आहे.
Mumbai: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray receives Governor Bhagat Singh Koshyari at Vidhan Bhavan. Governor Koshyari will address the state assembly shortly. pic.twitter.com/sEwJnD3ydu
— ANI (@ANI) December 1, 2019
दरम्यान राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज राज्यपालांनी विधानसभेत मराठीतून भाषण केले आहे. या भाषणात राज्यपालांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला.
पाऊस लहरी झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. या शेतकऱ्यांना तत्काळ सहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध असेल. आणि त्यासाठीआवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन राज्यपालांनी या भाषणाद्वारे दिले आहे.