बारामती(प्रतिनिधी) – चांगलं कामकाज चालले असताना महाविकास आघाडीच्या सहकार्यांनी त्यात मिठाचा खडा टाकून वाद वाढवू नये. अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत थेट इशारा दिला आहे.
अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद हे अपघाताने मिळाले आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, कोणाला मंत्री करावं आणि कोणाला कुठलं मंत्रीपद द्याव हे आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हेच ठरवत असतात. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार असणाऱ्यांनी आपल्या सहकार्यांना अडचणीत आणायचा प्रयत्न करू नये . त्र्यस्थानी केले तर ठीक आहे मात्र महाविकास आघाडीच्या सहकार्यांनी अस वक्तव्य करून एकंदरीत कामकाज पाहत असताना कुठेतरी वाद वाढण्यासाठी मिठाचा खडा टाकू नये अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.